डॉ होमी भाभा भारतीय अणुभॏतिकशास्त्रज्ञ होते.भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरी मुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रेणता मानले जाते.
जिवन परिचय :
भाभा यांचा जन्म ३० आॅक्टोबर १९०९ रोजी झाला सदन पारशी कुटुंबात झाला.वडिल जाहागीर भाभा हे बॅरिस्टर होते . पुस्तकाची आवड असल्यामुळे घरातच पुस्तके गोळा केली होती.त्यात विज्ञान
विषयाचीही पुस्तके होती.होमी भाभा यांना या पुस्तकामुळे विज्ञानात स्वाभाविक पुणे आवड निर्माण झाली.शिवाय कवितेचा व चित्रकलेचा छंद होता.अतिशय सुंदर , देखणे व्यक्ती महत्व लाभलेले डॉ होमी भाभा उत्तम वक्ता होते.
शिक्षण व पुरस्कार :
त्यांचे प्राथमिक शिक्षण व पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले.डाॅ.होमी बाबांच्या वडीलांना वाटे होमी यांनी इंजिनिअर व्हावे पण होमी भाभा यांनी गणित आणि भैतिकशास्त्र या विषयात विशेष आवड असल्याचे आपल्या वडिलांना ठामपणे सांगितले वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनिअर ची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली
वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज
विद्यापीठातुन इ.स.१९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनिअर झाले.तसेच पाॅल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यास करित राहिले.त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती व अनेक बक्षिसे मिळाली
.सन१९४१ साली डॉ.भाभा राॅयल सोसायटीचा फेलो म्हणुन निवड झाली.डाॅ.भाभा सन १९५१ मध्ये भारतीय विज्ञान कांग्रेस असोसिएशन चे अध्यक्ष होते.
कार्य :
इ.स.१९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ होमी भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था , बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले .इ.स.१९४५ साली टाटा मुलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य सांभाळून डॉ.भाभा टाटा मुलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स.१९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली.याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहु लागले.त्याच्या अथक परिश्रमाने भारत देशात अणु भट्टीची स्थापना होऊ शकली .अमुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रांच्या सभेत मांडणारे डॉ.भाभा हे पहिले वैज्ञानिक होय.डाॅ.भाभा यांनी पाया रचला म्हणुनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्ट्या सुरू करून त्यांचा विजय निर्मिती साठी उपयोग केला.तसेच १८ हे इ.स.१९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी करण्यात आली. आगष्ट १९५५ साली संयुक्त राष्ट्रांमध्ये परमाणु ऊर्जा शांतीपूर्ण वापराबद्दल आंतरराष्ट्रीय संमेलन झाले होते त्या सभेचे अध्यक्ष डॉ होमी भाभा यांना करण्यात आले होते.तेथे कनडा ने भारताला परमाणु रिएक्टर बनविण्यासाठी सहयोग देण्याचा प्रस्ताव दिला.तेथुनच बाबांनी जवाहरलाल नेहरू यांच्या परवानगीने कनाडा -भारत यांच्या संयुक्तरीत्या रिएक्टर (सायरस) परियोजना ची सुरुवात झाली.डाॅ.भाभानी डॉ सेना ना या परियोजना चे प्रमुख बनविले.सायरस परियोजना १० जुलै १९६० मध्ये आणि जरलिना परियोजना १४ जानेवारी १९६१ ला सुरू झाली.
6आॅगष्ट 1956 साली भारतात पहले रिएक्टर अप्सरा चे कार्य आरंभ झाले.त्यासाठी इंधन ब्रिटन ने पुरविले या रिएक्टरचा उपयोग न्यूॅटाॅॢन भौतिक विकिरण ,प्राणिशास्त्र, रसायनशास्त्र व रेडिओआईसोटोप साठी वापर केला जावू लागला.यामध्ये 1200 इंजिनिअर व कुशल कारागीर यांनी मिळून काम केले.रिएक्टर घ्या निर्मिती ने भारतात परमाणु शक्तीने चालणा-या विद्युत संयंत्र चार मार्ग सुकर झाला.या परियोजना द्वारे तारापूर येथे अणुशक्ती केंद्रात विज उत्पादन सुरू झाले.नंतर राजस्थान मध्ये राणा प्रताप सागर व तामिळनाडू मध्ये कलपक्कम दोन केंद्र स्थापन केले.
डॉ.भाभा ना विदेशी विदेशी युरेनियम व निर्भर राहायचे नव्हते स्वदेशी थोरियम, स्वदेशी प्लुटोनियम वापर करावा असे त्यांना वाटायचे.जगात थोरियम चार सर्वात मोठा भंडार भारतात आहे.केरळ मध्ये मोनाजाईट रेतीला संशोधीत करून थोरियम आणि फाॅस्फेट अलग अलग करून करण्यास सुरुवात केली.
निधन :
२४ जानेवारी १९६६ या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या सभेला जातांना फ्रान्सच्या हद्दीत असताना त्यांचे विमान अपघातात निधन झाले.त्याच्या मूत्यु नंतर टाॅॢम्बे येथील अणुसंशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले.
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog